मी एका पुस्तकात (बहुदा शिरीष कणेकरांच्या) हा विनोद (अर्थात काल्पनिक) वाचला होता – देव आनंदचा नवीन सिनेमा रीलीज झाल्यावर देव आनंदने प्रत्येक चित्रपटगृहात फोन करून किती प्रेक्षक आहेत ह्याची चौकशी करायला सुरुवात केली. बहुतेक चित्रपटगृहे रिकामीच होती. शेवटी एका ठिकाणी काही प्रेक्षक आहेत असे कळल्यावर देव आनंदने मॅनेजरला विचारले कि – “आत मध्ये एकूण किती प्रेक्षक आहेत?” तेव्हा मॅनेजर म्हणाला – “ते मी तुम्हाला चित्रपट संपल्यावरच सांगेन कारण किती प्रेक्षक आहेत हे बघायला चित्रपटगृहाचे दार उघडले तर, आहेत ते प्रेक्षक पण निघून जातील”
No comments:
Post a Comment